Friday, April 16, 2010

शब्द !

 

शब्दाला रूप नसतं, आकार नसतो, शब्द वाळवावे तसे वळतात, शब्द तोडावे तसे तुटतात. काहीही म्हटलं, तरी शब्दांना भावना मात्र नक्की असतात. शब्दांवर अमाप प्रेम करणारी माणसं आहेत ज्यांनी शब्दांना आकार दिला, सुंदर रूप दिले आणि त्याच सुंदर शब्दांचा संच करून आपल्या भावना व्यक्त करण्याचा मार्ग दाखवला. ह्या लेखणीतूनच आपले  आयुष्य जुडले गेले आहे आणि आयुष्याचा अर्थ समजण्याची क्षमता मिळाली आहे. 

भावना प्रत्येकाच्या मनात असतात, परंतु त्या व्यक्त करणे  सर्वाना जमतच असं  नाही. काही जणांना आपल्या मनातली भावना व्यक्त करणं कठीण नसतं परंतु काही कमनशिबी व्यक्ती इच्छा असूनही आपल्या मनातल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. 

लेखक आपल्या मनात दडलेल्या भावनांना रूप देतो जेणेकरून  सर्व साधारण मनुष्य आपल्या भावना अनुभवू शकतो आणि त्या मांडायला त्याला लेखकाच्या लेखणीचा आधार मिळतो. हल्ली 'chat' च्या जमान्यात मनातल्या भावना व्यक्त करणं किती सोप्पा झालाय कारण चारोल्यातून किव्हा शायरीतून मनातल्या भावना एकमेकान पर्यंत पोहोचवणं अगदी सहज झाले आहे. ह्या क्षणी मला एक इंग्लिश  गाण्याचे शब्द आठवले जे Boyzone ह्या ग्रूपनि गायले आहे. गाण्याचे नाव आहे 'Words', ज्यात एक ओळ आहे, " Its only words and words are all I have to take your heart away."


मनुष्य जन्म आपल्या नशिबी आला हे आपलं अहो भाग्य आहे, जो शेकडो वर्षानंतर एका आत्म्याला लाभलेला एक अमूल्य योग आहे. देवाच्या ह्या सुंदर देणी मुळे आपण आपले विचार डोक्यात मांडू शकतो, हृदयात अनुभवू शकतो आणि तेच शब्दात मांडून व्यक्त करू शकतो. हा लाभ इतर प्राणी मात्रांना नाही लाभलेला परंतु मनुष्य ह्या अनमोल देणीचा कितीपत योग्य उपयोग करतो? 

शब्दांनी माणसे  जशी जोडता येतात तशी तोडणे हि कठीण नाही. शब्द उच्चारून नाती बांधली जातात किव्हा तोडली जातात तसेच शब्द न उच्चारून सुद्धा नाती बनतात किव्हा बिघडतात. हीच शक्ती आहे ह्या अनमोल देणीची ज्याचा योग्य तो उपयोग करण्याचे सामर्थ्य केवळ मनुष्याला लाभला आहे. 

देवानी  आपल्याला भावना दिल्या, त्या व्यक्त करण्या साठी शब्द दिले, परंतु मनुष्य ह्या शब्दांचा उपजोग किव्हा दुरुपयोग अधिक निंदास्पद, किव्हा नकारात्मक भावना व्यक्त करण्या साठी करतो असं नाही का जाणवत? समोरच्याला दुखवणारे शब्द किव्हा कोणाचा दुस्वास करणारे शब्द जास्त कानी पडतात असं नाही का आपण अनुभवले? परंतु प्रेमाचे दोन शब्द किव्हा आपुलकीची दोन वाक्य, कोणाची प्रशंसा, हे शब्द केवळ कादंबरी पुरते मर्यादित आहेत का? ज्या गोष्टी आपण वस्तुस्थितीत अनुभवू शकत नाही, त्या दुर्लभ भावना  आणि शब्दांची ओळख व अनुभव आपल्याला आपले लेखक व कवी मंडळी लेखा व कविते द्वारे करून देतात. 

शब्दांना फुला प्रमाणे वेचावे, जपावे आणि प्रेमाने त्या शब्दांची उधळ करावी कारण शब्दांसारखे शक्तिशाली शास्त्र कोणतेच नाही. लेखणीची ताकद तलवारी पेक्षा जास्त असते. तलवारीचे घाव शरीरावर तर लेखणीचे घाव उरावर लागतात. प्रेमाच्या दोन शब्दाने कोणतीही  लढाई जिंकणं अशक्य नाही तसेच शब्दांच्या दुरुपायोगानी जिंकलेली लढाई हरायला वेळ लागत नाही. 

जेष्ट कवी सुरेश भट्ट यांनी लिहिलेले मराठी अभिमान गीत आज इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा नवीन पिढीच्या कानी पडले. अतिशय सुंदर रीत्ये संगीतकार कौशल इनामदारनी एका नव्या चालीवर कवी सुरेश भट्टचे शब्द गुंतले आहेत. ह्या प्रयोगामुळे आजच्या पिढीला शब्दांचे मोल कळले आणि ह्या पिढी पुढे हे गीत मांडण्याचा संकल्प यशस्वी रीत्ये पूर्ण झाला. ह्या गाण्याला युवा पिढीने सुद्धा सलामी ठोकली आणि अप्रतिम प्रतीसाध दीला. तेव्हा शब्दाचं महत्व आणि जाण हि काही जणांना तरी आहे हे पाहून मनाला सुकून मिळाले. आज पुन्हा एकदा मराठी माणसांच्या मनात मराठी अस्मिता जागृत करण्याचे कार्य कवी सुरेश भट्ट च्या ह्या कविते मुळे झाले आहे कारण केवळ  त्यांच्या शब्दांमुळे ह्या युवा संगीतकाराला ह्या शब्दांना वेगळे रूप देण्याचे उत्तेजन मिळाले. नवीन पिढीचे पसिद्ध कवी संदीप खरे यांच्या प्रत्येक कवितेत सर्व साधारण माणसाच्या भावना दडलेल्या दिसतात. त्या शिवाय 'दमलेल्या बाबाची कहाणी'  ऐकून स्त्री असो किव्हा पुरुष, लहान मुल असो किव्हा थोर, प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूंची धार उगाच व्हाहत नाही. शब्दांची टाकत पुर्शी अहंकाराला सुद्धा ठेचू शकते हे संदीप खरेंच गीत सिद्ध करतं. आपले लेखक, आपले कवी यांनी शब्दांना एकत्रित करून जीवनाला निरनिराळ्या दृष्टीकोणाशी परिचय घडवून दिला. ह्याच आपल्या महान लेखकांना आणि कवींना  माझे नम्र अभिवादन आणि हा लेख त्या महान लेखकांना आणि कवींना समर्पित. शब्दांची टाकत अशी न्यारी. ह्या शब्दांना योग्य रूप देणाऱ्या ह्या सर्व शिल्पकारांना माझे नम्र अभिवादन.