Tuesday, July 16, 2013

झपाटले रे …

 

                                                                                                                     

कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित होत असला की एक महिन्या आधी पासूनच आमच्या घरी त्याची चर्चा सुरु होते. चित्रपटाच्या गोष्टी म्हटल्या की माझे कान नकळतच बंद होतात आणि ते शब्द बंद कानावर जणू आदळत असतात. तरी एखादा चित्रपट चांगला असेल असा वाटले तर मी स्वतः तो पाहण्यासाठी आतुर असते. कधी आपल्याला एखाद्या नायक किव्हा नायिके साठी तो चित्रपट पहावासा वाटतो तर कधी एखाद्या दिग्दर्शका साठी तर कधी एखाद्या मोठय निर्मिती गृहाच्या नवामुळे आणि जेव्हा ह्या सगळ्याच गोष्टी एकत्र येतात तेव्हा उत्साह द्विगुणीत होतो. 

 

 'तात्या विंचू' परत येतोय! ही घोषणा गेले काही वर्ष ऐकल्या पासूनच मराठी चित्रपट पाहणाऱ्या शोत्यांच्या मनात एक उत्सुकता आणि खळबळ चालू झालेली. काही चित्रपट असतात ज्यातली पात्र लोकप्रिय होतात आणि त्या पात्रांची नावे अजरामर होतात. गब्बर सिंग म्हणा किंव्हा विजय दिनानाथ चौहान, मोगाम्बो असो किव्हा शाकाल, लहानान पासून मोठ्यान पर्यंत प्रत्येकाला ह्या पात्रांची ओळख आहे. तसेच आपले 'तात्या विंचू' आणि 'कुबड्या खवीस'. जर 'गब्बर सिंग' चा खौफ हिंदी सिने सृष्टीत आहे तर मराठी सिने सृष्टीत 'तात्या विंचू' चा  राज आहे. अशी पात्र निर्माण करून लोकां पर्यंत पोहोचवणं सोप्पी गोष्ट नाही आणि जरी ती लोकां पर्यंत पोहोचवली तरी त्या पात्रांना एक जिवंत रूप देऊन श्रोत्याच्या आयुष्याचा भाग बनवणं अजूनही कठीण. पात्रांना जिवंत स्वरूप आणून आपल्या आयुष्याचा भाग बनवणे दिग्दर्शकाचे काम आहे आणि ते यशस्वी पणे साधलाय आपल्याच महेश कोठारे यांनी. 

 

सतत काहीतरी नवीन करण्याचे धाडस महेश कोठारे करत असतात आणि त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून एक तांत्रिक प्रगती दिसून येते. मारठी सिने सृष्टीला महेश कोठारे यांचे बरेच मोठे योगदान आहे आणि १९८५ पासून त्यांनी जी चळवळ चालू केली आहे, त्या चळवळीने संपूर्ण महाराष्ट्र आता झपाटून गेला आहे. अतिशय अभिमान वाटतो हे घोषित करताना की मराठी सिने सृष्टीला पहिला ३ डी चित्रपट देणारे आपले महेश कोठारे आहेत. 'झपाटलेला २' हा उत्तम दर्ज्याचा उत्कृष्ट सिनेमा असून केवळ दोन आठवड्यात ५ करोड च्या वर धंदा केले आहे. महेश कोठारे यांच्या नवा खाली अजून एक विक्रम नोंदण्यात गेलाय आणि तो म्हणजे 'झपाटलेला २' हा चित्रपट तिसर्या आठवड्यात सुद्धा २४० 'स्क्रीन्स वर प्रदर्शित केला गेला.

 

धूम धडाका पासूनचे त्यांचे सर्व चित्रपट यशस्वी झालेच होते. दे दाणादाण, थरथराटधडाकेबाज, झपाटलेला, खतरनाकपछाडलेला, खबरदार सारखे असे अनेक चित्रपट आपल्याला देऊन महेश कोठारे यांनी आपला एक वेगळाच ठसा उमटवला आहे. एक आघाडीचा चळवळीचा दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव मराठी सिने सृस्तीतच न्हावे तर हिंदी सिने सृष्टीतही आदराने घेतले जाते. महेश कोठारे यांनी मराठी सिने सृष्टीला पहिला सिनेमास्कोप चित्रपट 'धडाकेबाजह्याची निर्मिती आणि दिग्दर्शन करून दिला.'चिमणी पाखरे' चित्रपटातून त्यांनी प्रथमच मराठी सिनेमात डॉल्बी डिजिटल ध्वनी मुद्रण आणले. संगणकाचा उपयोग करून एका वेगळ्या पद्धतीने चीत्रीकरण करून महेश कोठारे यांनी 'पछाडलेला' ह्या चित्रपटाला एक उच्च तांत्रिक दर्जा दिला जो मराठी सिने सृष्टीत पहिल्यांदाच पाहिला गेला आणि आता ' झपाटलेला २' मध्ये उच्च दर्ज्याचे ३ डी टेक्निक आणि संगणक ग्राफिक्स चा उत्तम उपयोग केलेला दिस्तो. 

 

मित्रानो, आता 'महेश कोठारे' म्हणून महेश कोठारेंचे संबोधन इथेच संपवते बरं का? इतका वेळ मी केवळ एक उत्कृष्ट निर्माते आणि दिग्दर्शक 'महेश कोठारे' बद्दल बोलत होते ज्यांच्या बद्दल असंख्या टी. व्ही. वाहिनी आणि असंख्य मासिक, वूत पत्रात म्हटले गेले आहे. आपल्याला सर्वाना त्यांची खाय्ती माहीतच आहे आणि मी काही नवीन सांगत नाहीए. परंतु सांगितल्या शिवाय राहवत सुद्धा नाही. इतर त्यांना महेशजी, कोठारे साब, किव्हा महेश सर म्हणून संबोधित करत असतील आणि त्यांच्या बद्दल खूप काही लिहिले सुद्धा असेल. परंतु ह्या पुढे मी तसे करणार नाही. कारण येव्डेच की ते आपल्या परिवाराचा हिस्सा आहेत आणि आपल्या माणसांना आपण घरच्या माणसां सारखेच संबोधिले पाहिजे, नाही का? मी त्यांच्या पुढे बरीच लहान असल्यामुळे ह्या पुढचा उल्लेख महेश मामा म्हणूनच करावासा वाटतो.  

 

७ जुन २०१३ ला 'झपाटलेला २' प्रदर्शित झाला आणि दुसर्या दिवसा पासूनच 'फेसबुक' वर महेश मामानी मराठी श्रोत्यांना झपाटून टाकल्याची बातमी कळली. मी चित्रपट प्रेमी नसून सुद्धा महेश मामाचा चित्रपट पाहणे माझ्या साठी अत्यंत गरजेचे होते. मुलांना घेऊन दुपारच्या शो ला गेले. अपेक्षा भरपूर होत्या ह्या चित्रपटातून परंतु चित्रपटाच्या सुरुवाती पासून एक समीक्षक म्हणून त्या चित्रपटाकडे पाहत होते. कोठारे परिवाराच्या प्रत्येक सिनेमाला मी कायम एका समीक्षकेच्या नझरेतून पहिले आहे आणि त्यातले गुण दोष कळवले आहेत. त्यामुळे चित्रपट सुरु होताच माझ्यातली टीकाकार जागी झाली परंतु पहिल्या प्रवेशानीच आपला ठसा उमटवला. 'कुबड्या खवीस' चा त्या संग्रहालयात ला ३ डी प्रवेश उत्कृष्ट होता. त्या पुढे अपेक्षा वाढत गेली आणि ती महेश मामानी पूर्णपणे सार्थ केली. कसलीच कमी वाटली नाही आणि चित्रपट गृहात आलेयांची सकारात्मक प्रतिक्रिया ऐकून त्यांचा अधिकच अभिमान वाटू लागला. मुलांना सुद्धा चित्रपट इतका आवडला की घरी आल्या बरोबर बाबांनी सुद्धा पहिलाच पाहिजे म्हणून रात्रीच्या शो ला जाऊ असा आग्रह चालू होता. हीच खासियत असते महेश मामाचं चित्रपटांची कि ते सर्व वयोगट मजेत पाहू शकतात आणि कितीही वेळा पहिले तरी तेव्दाच आनंद लुटू शकतात. 

 

ह्या चित्रपटात अजून एक महत्वाची गोष्ट होती जी मला पाहण्यात उत्सुकता होती आणि ती म्हणजे आदिनाथ कोठारे ची भूमिका आणि त्याचे काम. आदि चे प्रत्येक काम मी पाहिले आहे आणि त्याची अभिनयाची स्वाभाविक कल सुद्धा पाहिली आहे. परंतु प्रत्येक नवीन नायकाला आपले स्थान कायम ठेवायला असंख्य अश्या परीक्षा द्याव्या लागतातच. आदिचा प्रवास बरीच वर्ष चालू आहे आणि त्याच्या प्रगतीचा ठसा तो त्याच्या प्रत्येक भूमिकेतून  देत आलाय. त्याची हीच प्रगती प्रत्यक्षात पहायची होती आणि अभिमान वाटतो हे घोषित करताना कि आदिनाथ कोठारे यांनी 'झपाटलेला २' मध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे आणि एक 'chocolate boy' म्हणून प्रत्येक तरुणीच्या मनात घर करून गेला आहे. तरुण मुलीच कशाला, लहान मुला मुलीन कढून सुद्धा आदिनाथ कोठारे चे नाव ऐकून बरे वाटते. अतिशय देखणा त्याच बरोबरीने सोज्वळ असे व्यक्तिमत्व असलेला आदि ह्या सिने सृष्टीत स्वतःचा अस्तित्व कयाम करेल ह्याची खत्री आहे. 'ऑल ध बेस्ट' सारख्या यशस्वी नाटकाचे असंख्य प्रयोग करून आदि ने कॉमेडीची timing बर्या पैकी साधली. चित्रपटाच्या शेवटी आदि आणि तात्या विंचू ची लढाई अतिशय सुंदर रीत्ये चित्रित केली आहे आणि त्यात आदिचे विशेष कौतुक करावेसे वाटते.  आपल्या मराठी सिने सृष्टीला ज्या नायकाची कमी भासत होती ती आता आदि पूर्ण करेल ह्यात शंका नाही. 

 

टी .व्हि. वरच्या एका मुलाखतीत महेश मामा आणि आदि ला मराठी सिने सृष्टीतले अमिताभ - अभिषेक म्हटले गेले. परंतु मी ह्या मताशी सहमत नाही. महेश मामा एक अप्रतिम दिग्दर्शक आहे ज्याला उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्म फ़ैर, स्क्रीन आणि महाराष्ट्र राज्य चे विविध पुरस्कार मिळाले आहेत. २००९ साली मराठी सिने सृष्टीला लक्षणीय योगदान केल्या बद्दल महाराष्ट्र राज्याने महेश कोठारेंचा गौरव केला. त्यामुळे एक उत्कृष्ट निर्माते दिग्दर्शक म्हणून त्यांचे नाव घेणे योग्य ठरेल आणि राज कपूर, मनमोहन देसाई, ह्रीशिकेश मुखर्जी सारख्या दिग्दर्शकांच्या नवा बरोबर त्यांचे नाव घ्यायला काहीच हरकत नाही. महेश मामा नी मराठी सिनेमात अजून एक लक्षणीय वेगळेपणा केला. त्यांनी त्याच्याच चित्रपटाचा दुसरा भाग बनवला आणि त्याच बरोबरीने 'तात्या विंचू' ला जिवंत ठेऊन श्रोत्यांची उत्सुकता आणि अपेक्षा अजून वाढवली आहे.  चित्रपट गृहातून बाहेर येताना प्रत्येक जणांनी 'झपाटलेला ३' ची वाट बघण्याचे व्यक्त केले. ज्या रीतीने 'झापालेला २' नी सर्वांना झपाटून टाकले आहे त्याच झपाट्याने महेश आणि आदिनाथ कोठारे च्या प्रत्येक चित्रपटाला अशीच लोकप्रीयता मिळावी, अधिकाधिक पुरस्कार आणि जनतेच्या प्रेमाचा वर्षाव होवो हीच सदिच्छा. 

 

 

Wednesday, May 8, 2013

मित्र

                                                                                  मित्र          


मुलांचे वाढदिवस जवळ आले की मित्र मैत्रिणींची यादी बनवण्या पासून जय्यत तयारी सुरु होते. पण मजेशीर गोष्ट म्हणजे त्या यादीतली  'बेस्ट फ्रेंड्सची नावे दर वर्षी बदलत असतात. दर वर्षी कशाला, रोजच त्यांचे 'बेस्ट फ्रेंड्सबदलतात हे पाहून हसू येतं. त्या निरागस वयात 'मित्रह्या शब्दाचा अर्थच मुळात त्यांना कळत नसतो. आज कोणी चांगला वागला तर तो आपला 'बेस्ट फ्रेंड', दुसर्या दिवशी वाईट वागला की त्याचे 'बेस्ट फ्रेंड' च्या यादीतून नाव वगळले जाते आणि तिसर्या दिवशी एक नवीन 'बेस्ट फ्रेंड' उगवतो. त्या वयात कुणाला ठाऊक असतं 'मित्र' कुणाला म्हणतात.


आई बाबा लहानपणा पासूनच आपली  काळजी घेत असतात आणि सावध करत असतात की मित्र चांगले बनवा कारण आपल्या संगोपनावर संगतीचा फार मोठा प्रभाव पडतो आणि आपले व्यक्तिमत्व आपल्या मित्र मंडळींवर  अवलंबून असते. मुलगा वाईट मार्गाला लागला की लग्गेच निष्कर्ष केला जातो की त्याची सांगतच वाईट असणार. त्यामुळे मित्र 'चांगलेबनवा अशी ताकीद लहान पणा पासूनच दिली असते. आपण कितीही सावध राहिलो तरी कोणी आपल्या आयुष्यात येणे आणि जाणे हे आपल्या हातात नसते कारण तो आपल्या नशीबाचा भाग असतो आणि पूर्व जन्माचे भोग. 


आपल्या आयुष्यात येणारे आपले मित्र अश्या व्यक्ती असतात ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते नसते तरी रक्ताच्या नात्याहून पक्के असे नाते जुळून येते. आपल्या आयुष्यातले सुखाचे क्षण साजरे करायला दुनिया उभी राहते पण दुख वाटून घेणार्यांना 'मित्र' असे म्हणतात. छोट्या मोठ्या गोष्टी असो किंव्हा आयुष्यातला सर्वात गंभीर विषय. कोणत्याही विषयावर ज्याच्या जवळ मनमोकळे करता येते, तो 'मित्र'. 'मित्र' आपल्या पोरकट किंव्हा  अर्थशुन्य गप्पान मध्ये सुधा तेवद्याच उत्साहाने भाग घेतो त्यामुळे त्याच्याशी कोणत्याही विषयावर बोलायला कसलीच लाज किंव्हा संदेह वाटत नाही. 


आपल्या बर्याच जणांचे लहानपण, मित्र आणि आपल्या चुलत, मावस, मामे भावंडान बरोबर अतिशय मजेत गेले असणार,नाही का? आपल्याला ते सुंदर दिवस आठवतही असतील कारण आपल्या नकळत, तेव्हा आपण कदाचित त्यांच्याशी एका मित्रा सारखेच वागत असु. धमाल मस्ती, राग रुसवे, चेष्टा मस्करी आणि लाड प्रेम सुद्ध. सर्व अविस्स्मारानिया आठवणी आपण मनाच्या ओंजळीत घेऊन मोठे होतो. तेव्हाचा राग रुसवा कधीच मनाला लागलेला नसतो कारण तेव्हा केवळ मैत्रीचे नाते जुळलेले असते. मित्रांच्या बोलण्याचे जसे वाईट वाटत नाही तसे बहिण भावंडांचे सुद्धा कधीच मनाला लागत नाही. जेव्हा मैत्री मिटून एक नातेवाईक म्हणून आपण भेटत जातो, तेव्हा त्या नात्यातली मैत्री कुठे तरी हरवून जते. त्या 'मैत्री' चा सहवास मिटून जातो आणि राहतात ती फक्त नवा पुरती नाती. 


नात्यापेक्षा मैत्रीला महत्व दिलेले आमच्या घरी चालत नसे त्यामुळे मित्रांना नातेवाईकांना पेक्षा अधिक महत्व देण्याची परवांगी न्हवती. परंतु जे नशिबात लिहिले गेले आहे ते कोणीच बदलू शकत नाही. त्यामुळे अश्या काही भावंडांशी जवळीक झली ज्यांना सुद्धा नात्या पेक्षा मैत्रीवर विश्वास आहे. असे नाते जुळले त्यांच्याशी की बहिण भावाचे नाते राहिले बाजूला, आम्ही भेटतो ते केवळ 'मित्र' ह्या नात्यानी. एकमेकांच्या सुख दुखात हक़्क़ाने सहभागी होणारे असे मित्र. राग रुसवा मनाला न लावता गैर समज एकत्र बसून दूर करणारे हे मित्र. अश्या मित्रां मुळे नाती जपली जातात आणि आनंद द्विगुणीत होतो. 


मुलांच्या त्या 'बेस्ट फ्रेंड' च्या यादी वरून मला माझ्या 'बेस्ट फ्रेंड्स' ची आठवण झाली. 'बेस्ट फ्रेंड्स' ची यादी कधीच लांब लचक नसते हे मुलांना त्यांचा स्वानुभवाच शिकवू शक्तो. शाळेत आणि कॉलेजात असताना "ते दोघे" कधीच माझे 'बेस्ट फ्रेंड्स' न्हव्ते. आमची मैत्री फुलली ती वर्षा नु वर्षाच्या सहवासानी. एकमेकांचे दोष जाणून सुद्धा जेव्हा आपण एकमेकाना 'मित्र' म्हणून स्वीकारतो तोच खरा मित्र. फोनेवरच्या आवाजावरून मनस्थिती ओळखणारे हे मित्र. दुखाची चाहूल लागताच दारात उभे राहणारे हे मित्र. रडता रडता हसवू शकणारे हे मित्र. प्रत्येक दोष जाणून सुद्धा प्रेम करणारे हे मित्र. क्षणात खोटेपणा पकडणारे हे मित्र. ह्यांच्या पासून दुख लापावूच शकत नाही आणि सुखाची बातमी पहिला त्यांना कळवल्या शिवाय चैन पडत नाही. आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीवर ज्यांची साथ हवीहवीशी वाटते असे हे मित्र. ह्यांना पाहिले कि मनात एकाच विचार येतो, "ये रिश्ता क्या केहेलाता है? "


हे नाते असते विश्वासाचे, हे नाते असते प्रेमाचे. खर्या प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असते त्या मित्रांची. असा अजून एक खास मित्र माझ्या आयुष्यात आला. २० वर्षां पूर्वीची ती ओळख. हसरा, मनमिळावु आणि अतिशय नम्र असे व्यक्तिमत्व. मदतीचा आणि मैत्रीचा हाथ कायम पुढे ठेवणारा असा माझा सर्वात खास मित्र. माझ्या प्रत्येक वागणुकीला समंजस पणे हाताळणारा हा मित्र. प्रत्येक चूक समजावून, माझे मत परिवर्तन करून, कोणतीही परिस्थिती योग्य रित्य सांभाळणारा हा मित्र. आमच्या आवडी सारख्याच असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत धमाल मस्ती असतेच. मित्रां मध्ये केवळ प्रेम असून मजा नाही. त्या नात्याला कायम सतेज ठेवण्यासाठी  थोड्या लढाईची सुद्धा गरज भासते. आमची सर्वात मोठी लढाई होते चित्रपटावरून. त्याला प्रत्येक चित्रपट पहायची आवड आणि मला त्या चित्रपट गृहात ३ तासांचा मौल्यवान वेळ वाया घालवणे, म्हणजे 'त्यावेळेचा अपमान केल्या सारखे वाटते. तरी कोणत्याही लढाई नंतर प्रेमानी समजूत काढणारा हा मित्र. 


कधीतरी विसरायला होते की ह्या मित्राशीच आपले लग्न झाले आहे आणि त्याला सगळ्या गोष्टी सांगायला नको. परंतु ही मैत्रीच येवडी खास आहे की नवरा बायकोच्या नात्याला सुद्धा एक वेगळाच ताजेपणा येतो. 'मैत्रीत एवडे सामर्थ्य आहे की ते कोणतेही नाते फुलवू शकते आणि ते आयुष्यभर तसेच तेजस्वी राहू शकते. मित्रांशिवाय आयुष्य रटाळ होतं ह्यात शंकाच नाही. 'मित्र' हे माझ्या जीवनाचा अतिशय महत्वाचा भाग तर आहेतच आणि त्यांच्या शिवाय जीवन म्हणजे जिवंत पणे मेल्या सारखे. 


अशी मैत्री जपणारी आणि मित्रांचे महत्व जाणणारी काही माणसे भेटली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ती 'सासरची माणसे' आहेत. 'नवरा' माझा 'बेस्ट फ्रेंड' आधी पासूनच होता परंतु असेही नातेवाईक भेटले ज्यांनी एकेरी नावानी संबोधीत करण्याची परवांगी दिल्ली आणि मैत्रीचा हाथ पुढे केला. लग्न झाल्या बरोबर एका नवीन सुनेला ह्याच्याहून जास्त कोणी काय देऊ शकतं? प्रचंड आनंद झालेला ह्या नवीन मित्रांना भेटून आणि अजूनही त्यांच्या त्या मैत्रीला माझा सलाम. 


इतक्या वर्षांच्या अनुभवातून हे जाणवले की कोणतेही नाते जपण्या साठी मैत्रीचे नाते जुळून येणे अतिशय महत्वाचे आहे. 'मैत्रीचे' नाते कधी मागून मिळत नाही. ते नाते मनाचे असते. मन जुळली की मैत्री होते आणि प्रेमाचे असे एक अतूट नात जुळून येते. ह्यात एकच धोका असा कि, मैत्री करणाऱ्यांचे मन कितपत साफ आहे हे कसे कळणार? कोणी स्वार्थासाठी मैत्री करण्याचे ढोंग करतात किव्हा अजून काही कारणा मुळे . आज 'फेस बुक' वर माझी मित्रांची यादी ७००- ८०० च्या घरात जरी असली तरी त्यातले किती मित्र खरे आहेत हे मी जाणून आहे. मित्र म्हणून बरेच हाथ पुढे करतात परंतु त्यांना 'मित्र' असे म्हटले तर 'मित्र' ह्या शब्दाचा अपमान होईल. मैत्री, एक प्रकारची जबाबदारी असते हे बर्याच लोकांना माहित नाही. केवळ 'मित्र' आहोत असे म्हटले म्हणजे कोणी मित्र बनू शकत नाही. त्यासाठी 'मैत्री' सिद्ध करून दाखवावी लागते आणि ती वर्षानुवर्षाच्या सानिध्याने आणि अनुभवातूनच आपली जागा कायम राखू शकते. 


ह्या सगळ्या गोष्टी कुणाला सांगून किव्हा समजावून समजण्या सारख्या नाहीत. ह्या गोष्टी केवळ तेच समजू शकतील ज्यांनी 'मैत्री' करून ती निभावली आहे आणि ज्यांना मित्रांची खरी ओळख पटली आहे. 'मैत्री' तेव्हाच फुलते जेव्हा त्या मित्रांमध्ये 'प्रेम' असतं. 'प्रेमाशिवाय ती मैत्री टिकूच शकत नाही कारण आपण एखाद्या व्यक्ती साठी वाट्टेल ते करून त्या व्यक्तीला खुश ठेवतो जेव्हा आपण त्या व्यक्तीवर अतिशय प्रेम करत अस्तो. प्रत्येक नात्याची सुरुवात ही मैत्रीतूनच होत असते आणि तीच नाती वर्षानुवर्ष जोपासली जातात. देव कृपेने असे खूपच प्रेमळ 'मित्र' मला बर्याच रुपात भेटले ज्यांच्या सानिध्यात राहून आयुष्याच्या कोणत्याही अडथल्याना सामोरे जाण्यासाठी मी सशक्त झाले. माझ्या आयुष्यात ह्या सर्व मित्रांची उपस्थिती अतिशय महत्वाची आहे. मनात आलेली कोणतीही नकारात्मक भावना कायमची मिटून टाकण्यात ह्या सर्व मित्रांचा सिंव्हाचा वाटा आहे हे मी कधीच विसरणार नाही. माझ्या आयुष्यात आलेल्या माझ्या प्रत्येक मित्राला माझा प्रेमाचा सलाम.